Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

ACCIDENT NEWS : मोटारसायकल वेळ प्रवास करणं बापलेकांसाठी पडलं महागात; पहा सविस्तर…

accident NEWS : मोटारसायकल वेळ प्रवास करणं बापलेकांसाठी पडलं महागात. हि अतिशय भयानक घटना बार्शिटाकळी- मंगरुळपीर मार्गावरील आहे. या अपघातात पीकअपने मोटारसायकलीवरून जात असलेल्या जोरदार धडक दिली घडली दुरदैव घटना.या घटनेत बापलेक जागीच ठार.

AKOLE ACCIDENT NEWS

मोटारसायकल वेळ प्रवास करणं बापलेकांसाठी पडलं महागात. हि अतिशय भयानक घटना बार्शिटाकळी- मंगरुळपीर मार्गावरील आहे. या अपघातात पीकअपने मोटारसायकलीवरून जात असलेल्या जोरदार धडक दिली घडली दुरदैव घटना.या घटनेत बापलेक जागीच ठार.

मोटारसायकलीवरून जात असलेल्या बापलेकांना पीकअपने जबर धडक दिल्याने झालेल्या बार्शीटाकळीजवळच्या मार्ग अपघातात लाखनवाडा येथील रमेश हरिभाऊ सिरसाट (६०) आणि उमेश रमेश सिरसाट (३२) या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला

ACCIDENT NEWS
ACCIDENT NEWS

ही घटना बार्शिटाकळी मंगरुळपीर मार्गावरवरील पिंजर टि पॉईंट जवळ घडली. एकाच वेळी झालेल्या बाप-लेकाच्या मृत्यूने संपूर्ण तालुका हादरला आहे. अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा येथील रहिवासी रमेश हरिभाऊ सिरसाट (६०) आणि त्यांचा मुलगा उमेश रमेश

सिरसाट (३२) हे मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी शेतातून घरी परतत होते. दरम्यान अकोला-मंगरुळपीर रोडवरील, पिंजर फाट्याजवळ एका वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघेही बाप-लेर गंभीर जखमी होवून मरणासन्न अवस्थेत पडून होते. घटनेची

ACCIDENT NEWS
ACCIDENT NEWS

माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस घटनास्थळी पोहोचले स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर पिकअप चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सिरसाट आणि त्यांचा मुलगा उमेश दुपारी त्यांच्या शेतातून घरी परतत होते, परंतु एका निष्काळजी चालकाच्या चुकीमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अंधारात ढकलण्यात आले. या घटनेमुळे लखनवाडा गावात शोककळा पसरली. या अपघाताच्या निमित्ताने रस्त्यावरील वाहनांचा वेग, ओव्हरटेकिंगमधील

ACCIDENT NEWS
ACCIDENT NEWS

अपघात घडलेल्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा अपघात घडून निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे रस्ता दुभाजक व गतिरोधक बसवण्यात यावे. सदर ठिकाणी चहा टपरी, फळ, गुळपट्टी विक्रेते यांची दुकाने असल्यामुळे येथे वाहनं थांबतात. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन निष्पाप लोकांचे जीव जाणे थांबवावे.

– भारत बोबडे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते, बाशीर्टाकळी.
निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांचे अज्ञान यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. वृत्त लिहिण्यापर्यंत बाशीर्टाकळी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a comment