RAJ THACKERAY: मराठा आरक्षणाचा प्रश्न! राज ठाकरेंचा मोठा इशारा, मराठा आरक्षणाची जवाबदारी एकनाथ शिंदेंवर…
मराठा समाजासाठी मोठा दिलासा! राज्य सरकारने वंशावळ समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली, पात्र व्यक्तींना कुणबी आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची संधी; आरक्षण प्रक्रियेत नवे वळण, पहा काय होणार पुढे!

RAJ THACKERAY: मराठा आरक्षणाच्या मागणीत पुन्हा एल्गार! मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरूवात केली असून, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाने शहरातील राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्येही चिंता आणि अपेक्षा वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली.
ठाणे दौऱ्यावर असताना ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, माध्यमांनी मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी (RAJ THACKERAY) स्पष्ट केले की, “मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देतील. मुंबईकरांना खूप त्रास होत आहे. मागच्या वेळी नवी मुंबईत त्यांनी प्रश्न सोडवला होता, मग हे परत का आले? या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील.” त्यांच्या या विधानातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबाव निर्माण करण्याचा संकेत मिळतो.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत, शिंदे गटाचा विषय वेगळा आहे. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका परशुराम महामंडळवाली आहे, तर मिस्टर अजित पवार चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रिया नाही. अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती कुठून येणार?” राऊतांचे हे वक्तव्य आंदोलक आणि राजकीय विश्लेषक दोघांनाही चिंतेत टाकणारे ठरले आहे. अशा घाईघाईच्या राजकीय परिस्थितीत, मराठा आरक्षणाचा निर्णय (RAJ THACKERAY) आणि आंदोलनाचे पुढील टप्पे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महायुती सरकारच्या राजकीय घडामोडींवर थेट टीका केली. राऊत म्हणाले, “महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत, शिंदे गटाचा विषय वेगळा आहे. (RAJ THACKERAY) फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत.” त्यांनी पुढे म्हटले की, “देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत, तर मिस्टर अजित पवार चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत; त्यांची काहीही प्रतिक्रिया नाही.” अशा परिस्थितीत, राऊतांनी सवाल उपस्थित केला की, “राजकीय इच्छाशक्ती कुठून येणार?” त्यांच्या या वक्तव्याने सत्ता आणि विरोधक यांच्यातील गतीविधींवर राजकीय वातावरण आणखी तापले आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाच्या फडावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.
राज्य सरकारचा मराठा समाजाला मोठा दिलासा:

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन करण्यात आली होती. (RAJ THACKERAY) आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे, असे राज्य सरकारने ठरवले आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या निर्णयाची माहिती दिली असून, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या समितीच्या मुदतवाढीमुळे मराठा समाजातील पात्र नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कागदपत्रांसाठी अधिक वेळ मिळणार असून, आरक्षण प्रक्रियेला नव्याने गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
